रेमंड लक्झरी कागल कंपनीने कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई :- मे. रेमंड लक्झरी लि., कागल, जि. कोल्हापूर या कंपनीमधून कमी केलेल्या कामगारांना कंपनीने पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय आठ दिवसांत घ्यावा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

यासंदर्भात कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कामगार हा महत्वाचा घटक असल्याने मे. रेमंड लक्झरी कंपनीने कामगारांच्या भावना समजून घ्याव्यात. या कंपनीने कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेऊन त्यांना न्याय द्यावा.

कंपनीने कामगारांना कामावर घेण्याचा निर्णय आठ दिवसांत न घेतल्यास याबाबत कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल, कृषी विकासाला प्राधान्य - कृषीमंत्री धनंजय मुंडे

Wed Jul 24 , 2024
मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाहिलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल हा आजचा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राथमिक प्राधान्य देण्यासह आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात ज्या प्रमुख चार घटकांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com