– हायवे हायपोनासिस : पुन्हा ३ जणांचा बळी !!
नागपुर :- या समृद्धी हायवे वर ड्रायव्हर आणि अन्य प्रवाश्यांसाठी कोणतेही विश्रांती थांबे किंवा विसाव्याच्या सोई सुविधा निर्माण न करता फक्त कोट्यवधीचा टोल टॅक्स वसुली चे लक्ष्य पुढे ठेवून हा महामार्ग प्रवाशांचे बळी घेण्यासाठी च खुला करण्यात आला.
सरकारला कित्येक रिपोर्ट सादर करून सुद्धा जलद गतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने मुडदे पाडणे असेच सुरू राहील कां ?
आज पहाटे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर जवळ समृद्धी महामार्ग पुन्हा रक्ताळला आणि तीन प्रवासी चिरडून सर्वत्र किंचाळ्या व आक्रोश पाहून परिसर दणाणून गेला ! १५ पेक्षा जास्त प्रवासी कमी जास्त प्रमाणात जखमी झाले त्यातील ८ गंभीर आहेत , भरधाव बस कंटेनर चे मागून धडकून जो जबरदस्त झटका बसला, त्यामुळे अनेक प्रवासी मणका मोडून कायमचे पंगू होण्याचा धोका आहे !
या सरकारला जाग कधी येईल हे प्रभू श्रीरामचंद्रच जाणो !