अर्थसंकल्पात व्यापारी, गरीब, महिला व शेतकरी यांची निराशाच – काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते

नागपूर :- बीजेपीच्या मोदी सरकारमधील केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी सन २०२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात समाजातील विविध घटकांना न्याय दिले नसून अर्थसंकल्पात भूलभूलैया आहे. बीजेपी सरकारने मजूर,व्यापारी,शेतकरी व महिला यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. महागाई कमी करतील याची उत्सुकता महिलांमध्ये होती पण निराशा झाली. बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची योजनाच नाही.असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांचे मत आहे.

संसदमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात आदिवासी,ओबीसी ,दलित व अन्य मागासवर्गीयांना न्याय देणारी योजना नसल्याने निराशा झालेली आहे. युवकांना रोजगार देण्यासाठी , शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमी भाव मिळण्यासाठी,कर्ज माफी केलेली नाही यामुळे युवा,महिला, शेतकरी व गरीबांची घोर फसवणूक झालेली आहे. मोदी सरकारने संसदमध्ये अर्थसंकल्प सादर केला, तो सामान्य नागरिकांसाठी निराशाजनक आहे अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांनी टीका केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन नऊ रुग्णवाहिका सेवेत दाखल

Sun Feb 2 , 2025
– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेसह विविध लोकार्पण संपन्न नागपूर :- पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन भवन नागपूर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी झालेल्या कार्यक्रमात रुग्णवाहिका, कार्डीयाक रुग्णवाहिका, आंतररुग्ण रुग्णवाहिका, मनपासाठी रस्ते स्वच्छ करणाऱ्या रोड स्वीपींग मशीनचे आज लोकार्पण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने प्राप्त एकूण ९ नवीन रुग्णवाहिका जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!