गुरांना रस्ता ओलांडण्यापासून रोखण्यासाठी भारतामध्ये महामार्गांलगत बाहुबली कुंपण घालण्याचे नियोजन करण्यात येत आहे- नीतीन गडकरी यांची माहिती

नवी दिल्ली :- गुरांनी रस्ते ओलांडण्यामुळे मानवी जीवितहानी होणारे धोकादायक अपघात टाळण्यासाठी, गुरांना रस्ते ओलांडण्यापासून रोखण्यासाठी भारतातील महामार्गांलगत बाहु बली गुरे प्रतिबंधक कुंपण घालण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी विविध ट्वीट्सच्या मालिकेतून सांगितले आहे.

हे कुंपण 1.20 मीटर उंच असेल आणि एक सर्वसमावेशक उपाय म्हणून महामार्ग-30 च्या सेक्शन 23 वर घालण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी एक सादरीकरण म्हणून हे कुंपण काम करेल, असे ते म्हणाले.

हे गुरे प्रतिबंधक कुंपण बांबूपासून बनवलेले असून अतिशय प्रभावी आणि पर्यावरणस्नेही उपाय आहे, असे त्यांनी सांगितले. या कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूंवर क्रियोसोट तेलाची प्रक्रिया केली जाते आणि त्यावर एचडीपीईचा थर दिला जातो ज्यामुळे पोलादाच्या ऐवजी एक भक्कम पर्याय म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. या कुंपणाला प्रथम श्रेणीचे अग्नी मानांकन असून, ते सुरक्षा सुनिश्चित करणारे आणि आत्मनिर्भर भारताला अनुसरून आहे. यामुळे सर्व महामार्ग शाश्वत बनतील आणि वन्यजीव आणि गुरांची हानी कमी होईल, असे गडकरी यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुधारित वाळू / रेती धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Thu Jul 6 , 2023
मुंबई :- राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सुधारित वाळू धोरणासंदर्भात सद्य:स्थितीचा विभागनिहाय आढावा आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहसचिव रमेश चव्हाण, माधव वीर, उपसचिव अजित देशमुख यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com