कामठी तालुक्यातील प्रवासी निवारे कुणाचे सहारे ?

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली या योजने अंतर्गत कामठी तालुक्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले सदर बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या या निवाऱ्याची देखभाल, दुरुस्ती परिवहन मंडळातर्फे करणे गरजेचे असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे यामुळे सध्या गाव तिथे प्रवासी निवारा या योजनेचा फज्जा उडाला असून कामठी तालुक्यातील प्रवासी निवारे हे कुणाचे सहारे?असाही प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.

गावात पोहोचत असलेल्या एस टी बस चा प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना ऊन पावसापासून स्वतःचे संरक्षण व्हावे यासाठी गावा गावात गावफाट्यावर शासनाच्या वतीने प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत परंतू त्याचा फायदा प्रवासी साठी होत नसून अतिक्रमित लोकांसह गायम्हैस , बांधण्यासाठी , तर कुणी तर सायकलचे दुकान घातले तर कुणानी आपला निवारा करूनच ठेवला आहे परिणामी प्रवाश्यांना प्रवासी निवारा असल्यावर सुद्धा रोडवर किंवा झाडाच्या सावलीचा सहारा घेऊन वाहनांची ची वाट पहावी लागत आहे .

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाच दिवसाचा आठवडा लागू होऊनही शासकीय कर्मचाऱ्यांची लेटलतिफी कायमच !

Wed May 8 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कार्यालयीन वेळेचा उडतोय फज्जा, शासकीय कर्मचाऱ्याकडूनच शासन निर्णय परिपत्रकाची पायामल्ली – कामठी तहसील कार्यलयात लेटलतिफी अजूनही कायमच कामठी :- केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासकीय कार्यालयात सुद्धा पाच दिवसाचा आठवडा लागू करण्याविषयी 12 फेब्रुवारी रोजी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 24 फेब्रुवारी रोजी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने लागू केलेल्या शासकिय निर्णयानुसार 29 फेब्रुवारी 2021 पासून शासकीय कार्यालयात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com