पाण्यासाठी बसपा नेत्यांचा मनपाला घेराव 

नागपुर – चोवीस बाय सेवन चा फार्मूला घेऊन आलेली ओसीडब्ल्यू सपशेल नापास झाल्याने उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच मागील अनेक दिवसापासून नागपुरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे बसपा नेते उत्तम शेवडे, मनोज निकाळजे, नितीन वंजारी, चंद्रशेखर कांबळे, सुनंदा नितनवरे आदींच्या नेतृत्वात पाणीग्रस्त नागरिकांनी मनपा ला घेराव केला.

सुरवातीस मनपा आयुक्त बी राधाकृष्णन हे जागेवर नसल्याने बसपा नेत्यांनी समस्या ग्रस्तांना घेऊन अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी ह्यांची भेट घेऊन समस्येची गंभीरता समजावून सांगितली. दरम्यान मनपा आयुक्त उपस्थित झाले परंतु फक्त दोघांनाच भेटण्याची परवानगी असल्याचे सांगितल्याने बसपा नेते भडकले. होहल्ला झाल्यावर पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाला परवानगी दिल्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मनपा आयुक्तांनी समस्या सोडविण्यासाठी पाणी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता डॉ श्वेता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्येशी अवगत करण्याच्या सूचना दिल्या, डॉ ब्यानर्जी ह्यांना खालील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

??????
नागपूर शहरात मागील अनेक दिवसापासून नवीन वाटर लाइन टाकण्याचे व दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होत नव्हता. काही वस्त्यांमध्ये गडुळ (घाण) पाण्याची समस्या होती, काही वस्त्यात अतिरिक्त बिलाची समस्या होती, काही वस्त्यात कनेक्शन तोडण्याची समस्या होती, काही वस्त्यात पाईप लाईन टाकण्याची समस्या होती, काहींना कनेक्शन देण्याची समस्या होती, काही वस्त्यात पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करण्याची समस्या होती, स्लम वस्त्यांमध्ये जास्त बिल येण्याची समस्या होती. अशा विविध समस्या घेऊन बसपाचे शिष्टमंडळ संबंधित अधिकाऱ्यांना भेटले.

अंबाझरी, पांढराबोडी, सुदाम नगरी आदी स्लम पट्ट्यातील अनेकांचे नळ कनेक्शन कापले ते जोडावे व पेंडिंग बिल चे हप्ते पाडण्यात यावे तसेच त्यांच्यासाठी कमी दर ठेवण्यात यावा. सोबतच अभय योजना राबवावी. नारा परिसरातील साई मंदिर, निर्मल कॉलनी, ओम नगर, गणेश नगरी, अशोका नगर, विश्वभारती लेआउट, अंजनी पुत्र लेआउट, आंबा टोली, समता नगर, अन्वर लेआउट, धम्म ज्योती नगर, शिवप्रसाद सोसायटी, अंबिका सोसायटी, विजय लेआउट, नारी वस्ती या वसाहतीतील अर्धवट लाईन पूर्ण करावी. व जोपर्यंत लाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिकचे टॅंकर पाठवण्यात यावेत. जयताळा वसाहतीत पाणी सोडण्याची वेळ बदलन्यात यावी ही मागणी सुद्धा करण्यात आली. तसेच रेशीम बाग ते सिरसपेठ या भागातील गडर लाईनचे घाण पाणी पिण्याच्या पाण्यात मीक्स झाल्याने त्या दूषित पाण्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाल्याची माहिती सुद्धा देण्यात आली.

??????
शिस्तमंडळात मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, उत्तर नागपूर चे अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिण पश्चिम नागपूरचे अध्यक्ष ओपूल तामगाडगे, दक्षिण पश्चिम माजी अध्यक्ष सदानंद जामगडे, उत्तर नागपूर चे सचिव विवेक सांगोडे, पश्चिम नागपूर चे उपाध्यक्ष बबीता डोंगरवार, वैशाली गणवीर, विशाल बन्सोड, किरण कुमार पाली, राजू तांडेकर, वीरेश वरखडे, गौतम लोखंडे, जनार्दन मेंढे आदी प्रमुख कार्यकर्ता सोबत समस्याग्रस्त स्त्री पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बाबा जुमदेवजी यांची १०१ वी जयंती उत्साहात

Sun Apr 3 , 2022
– गट क्र. १० मधून निघाली रॅली नागपुर – अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज घडविणारे मानव धर्म व परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची १०१ वी जयंती रविवार (ता.३) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्ताने परमात्मा एक सेवक मंडळ गट क्र. १० च्यावतीने भव्य रॅली काढण्यात आली होती. जयंतीनिमित्ताने मंडळाकडून विविध धार्मिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com