प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

नागपूर :- “प्रधानमंत्री पीक विमा योजना” खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर विभागातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावर यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी राज्यात राबविण्यास २६ जून २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा १६ जून २०२४ पासून सुरू केली असून सहभागाची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ अशी निश्चित करण्यात आली होती.

शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ खरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्ही.एन.आय.टी. च्या रस्त्यांची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

Sat Jul 20 , 2024
नागपूर :- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकी वाहनचालकांसाठी व्ही.एन.आय.टी. च्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर अंबाझरी ते दक्षिण अंबाझरी मार्गावर सकाळी 9.30 ते 11.00 आणि सायंकाळी 5.00 ते 7.00 पर्यंत हा मार्ग नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (19 जुलै) या रस्त्याची पाहणी केली.हा मार्ग दुचाकी वाहनांना व रुग्णवाहिकांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com