सोयाबीन पिकाच्या खरीप पेरणीबाबत शेतक-यांना कृषि विभागाचे आवाहन

 नागपूर :  खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी व 75 ते 100 मिलीमिटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीसाठी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे वापरून पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहसंचालकांनी शेतकऱ्यांना केले आहे.

            प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पध्दतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी.  पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.

रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे व नंतरच त्यांची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

केंद्रीय राखीव पोलीस दल भारताची अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध

Sat Jun 11 , 2022
–    सीआरपीएफच्या  पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांचे प्रतिपादन –    जनरल ड्युटीच्या  401 सीआरपीएफ   जवानांच्या तुकडीचा    दीक्षांत समारंभ आणि शपथविधी नागपूरात संपन्न नागपूर – केंद्रीय राखीव दलातील जवान भारताच्या नक्षलग्रस्त भागात तसेच संवेदनशील  समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर तसेच ईशान्य भारतात तैनात केले जातात. आपल्या देशाच्या  आंतरिक सुरक्षेची  महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. केंद्रीय राखीव पोलीस दल भारताची अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सीआरपीएफच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com