दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांनी दिले मुख्याधिकारीला सामूहिक निवेदन 

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 10 अंतर्गत येणाऱ्या श्री टॉकीज चौक,निंबाजी अखाडा रोड, सत्तू हलवाई चौक तसेच कोळसा टाल सह आदी परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार जडत असल्याने अनेकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.यासंदर्भात कामठी नगर परिषद पाणी पुरवठा अभियंता अवी चौधरी यांना मौखिक तसेच भ्रमण ध्वनी द्वारे व्हाट्सएप वरून माहिती दिली मात्र अवी चौधरी यांनी माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांच्या माहिती ला केराची टोपली दाखवली यावरून पाणीपुरवठा विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांनी सदर विषय गांभीर्याने लक्षात घेत दूषित पाणी पुरवठ्याची समस्या त्वरित दूर करावी यासंदर्भात नगर परिषद चे प्रशासक संदीप बोरकर यांच्याकडे निवेदन सादर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा निर्णय; मनरेगाच्या वेतनात वाढ

Sat Mar 30 , 2024
पुणे :-देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सत्ताधाऱ्यांसर विरोधकही निवडणूक प्रचाराला लागले आहेत. यादरम्यान केंद्र सरकराने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरांच्या मजुरीत ३ ते १० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे मनरेगा मजूरांना पूर्वीपेक्षा जास्त मजुरी मिळणार आहेत. गुरुवारी (ता. २८) सरकारने याबाबतची अधिसूचना जारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com