-वर्षात तिघांना देण्याचा नियम, यंदा 5 जणांना सर्वोच्च नागरी सन्मान
दिल्ली :- देशासाठी योगदान देणाऱ्या आणखी तीन भूमिपुत्रांना भारतरत्न देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यात देशाच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्यासह देशाची माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांचा समावेश आहे. देशातील या 3 भूमिपुत्रांना भारतरत्न देण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवरून जाहीर केले. नुकताच हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. अडवाणी वगळता इतर चारही व्यक्तिमत्त्वांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेचे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वागत केले आहे.