प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत माहिती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षिस

उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेत्यांवर होणार कारवाई

चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी १ मार्च रोजी झालेल्या बैठकीत दिले असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे.

प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले, सर्व व्यावसायिक,वितरक,हार फुले विक्रेते यांच्याकडील प्लास्टिकचे आवरण असलेले बुके व खर्रा विक्री केंद्रांवरील पन्नी यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान प्लास्टीक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे.

बाजारात कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या की आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहचत आहे. प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत ५३८ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे १८५०० कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

बैठकीस सहायक आयुक्त विद्या पाटील,,नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे,राहू पंचबुद्धे, स्वच्छता विभागप्रमुख डॉ. अमोल शेळके, रफिक शेख,स्वच्छता विभाग कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी, एनयुएलएम कर्मचारी उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज 2 मार्चपासून दहावीच्या परीक्षेला झाली सुरुवात 

Thu Mar 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी तालुक्यातील 10 परीक्षा केंद्रात एकूण 2798 विद्यार्थीपैकी 41 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित – दहावीचा पहिला पेपर सुरळीत  कामठी:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी शालांत परीक्षेला आज 2 मार्च पासून सुरुवात झाली ही परीक्षा 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान कामठी पंचायत समिती केंद्राअंतर्गत येणाऱ्या 10 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.आज पहिला पेपर भाषेचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com