– आरक्षण संपविण्याची भाषा करणाऱ्याला आगामी निवडणुकीत अद्दल घडवा
– पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
– राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा
नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन चळवळीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणार, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. सोमवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात जयदीप कवाडे यांचा वाढदिवस युवा चेतना दिन म्हणून साजरा करण्यात आले. भव्य सत्कार सोहळयात लॉंग मार्च प्रणेते व पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते जयदीप कवाडे यांना शॉल व पुष्पहार देउन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, महाराष्ट्र प्रदेश महासचिव बापूराव गजभारे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, रंजना कवाडे, शहर अध्यक्ष कैलाश बोंबले, जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे यांच्यासह विदर्भ व जिल्हयातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, परदेशातून राहुल गांधीच्या विधानातून काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा समोर आला आहे. बाबासाहेबांच्या विरोधातील काँग्रेसी विचार हे यातून दिसून आले आहे. विरोधी पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्याकडून असे वक्तव्य हे त्यांची भविष्यातील योजना आरक्षणाला संपविण्याचे घाट असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी गांधी परिवाराची परंपरा ही बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधी होती. त्याच घराण्याची परंपरा जपण्याचे काम राहुल गांधी करीत आहे. बाबासाहेबांच्या आरक्षणला संपविणारे खरे काँग्रेसी आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांना अद्दल घडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असेही जयदीप वाडे यावेळी म्हणाले.
कार्यकर्त्यांकडून मिळालेले प्रेम हाच खरा सत्कार
‘रिपब्लिकन’ हा एकमेव राजकीय पर्याय डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे. रिपब्लिकन लोकांना शासनकर्ती जमात बनवण्याची आता हिच ती वेळ आहे, असे कवाडे यावेळी म्हणाले. आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीमध्ये समाजाच्या उध्दारासाठी पाच पिढ्यांपासून कवाडे कुटुंबिय समर्पित आहे. हे सर्व करीत असताना इतर राजकीय रंग, चळवळ बघितली. पंरतु, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची रिपब्लिकन ही संकल्पना साकार करण्याचे कार्य पीपल्स रिपब्लिकन पार्टी करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यानिमित्त केले. देशातील आणि राज्यातील युवकांना पक्षात मोठ्या प्रमाणात नेतृत्व देण्यात येणार आहे. पार्टीच्या विस्तार करण्यासाठी तरूण कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी येत्या काळात देण्यात येणार असल्याचे जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांकडून मिळालेले प्रेम हाच खरा सत्कार असल्याची भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
पंचशिला भालेराव भीम गीतांद्वारे प्रबोधन
भव्य सत्कार सोहळयात महाराष्ट्राचे ख्यातनाम पंचशिला भालेराव यांच्या भीम गीतांचे कार्यक्रमाने परिसर दणानून सोडला. याप्रसंगी जेष्ठ नेते बालू मामा कोसमकर, नागपुर शहर युवक आघाडी अध्यक्ष सोहेल खान, भगवानदास भोजवानी, अजय चव्हाण, नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष संजय खांडेकर, गौतम गेडाम, प्रकाश मेश्राम, सविता नारनवरे, पूनम मटके, शीतल खान, विपीन गाडगीलवार, रोशन तेलरांधे, पियुष हलमारे, सुरेश बोनदाडे, गौतम थुलकर, कुशीनारा सोमकुवर, वसीम खान, हिमांशु मेंढे यांनी विशेष प्रयत्न केले.
रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम
वाढदिवसानिमित्त ‘युवा चेतना दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड,दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे शहरातील विविध अनाथालय, रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवाय सर्व विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.