गोंड मोहल्यात 200 घरात पाणी, अजूनही कुणीच फिरकले नाही 

नागपूर :- दक्षिण नागपूरच्या मानेवाडा परिसरातील सिद्धेश्वरी नगर गोंड मोहल्ला येथील 200 घरात (झोपड्या) अतिवृष्टीचे पाणी घुसले. त्यामुळे घरातील सर्व गृह उपयोगी सामान खराब झाले. शासनाने सर्वे च्या नावाखाली ठराविक वस्त्यांचा सर्वे केला. परंतु या झोपडपट्टीत अजूनही कोणी सरकारी कर्मचारी फिरकला नसल्याची तक्रार सिद्धेश्वरी नगरातील सामाजिक कार्यकर्ते तुफान उईके, एड वीरेश वरखडे व बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केली आहे.

ही वसाहत मनपाच्या हनुमान नगर झोन अंतर्गत येत असून प्रभाग 34 मध्ये हिचा समावेश आहे. या वसाहतीतील दीपक उईके, टारझन नेताम, सागर उईके, राजेश मडावी, नागेश उईके, नर्मद धुर्वे, मुंडु उईके आदींनी या वसाहतीत वसाहतीतील अतिवृष्टी ग्रस्तांचा व त्यांच्या नुकसानीचा विना विलंब सर्वे व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन केली केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंचशील टॉकीज जवळील नाग नदीवरील नुकसानग्रस्त पुलाची होणार पुनर्बांधणी

Thu Sep 28 , 2023
नागपूर :- नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अशात पंचशील चौक येथे नाग नदीवर असणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला होता. आता या पुलाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पुलाचा बांधकामासाठी जवळपास ६ कोटी खर्चाचा अंदाज असनू, याकार्यास किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com