संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
– गावकऱ्यांनी 100 वर्षाची परंपरा कायम ठेवली
कामठी – तालुक्यातील येरखेडा येथील गावकऱ्यांनी सार्वजनिक मातामाय मंदिरात गाव सार्वजनिक गाव पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली इंग्रजाचे काळात 100 वर्षांपूर्वी येरखेडा गावचे सदाशिवराव पाटील यांनी गावात नैसर्गिक आपत्ती येऊ नये, पीक पाणी मोठ्या प्रमाणात व्हावे, गावात विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन समाजात राष्ट्रीय एकता निर्माण होऊन सुख शांती राहावी या उदात्त हेतूने सार्वजनिक माता माय मंदिराची स्थापना करून सामूहिक गाव पूजेला सुरुवात केली होती तीच परंपरा कायम ठेवत गावकरयानी दरवर्षी जुलै महिन्यात सार्वजनिक माता माय मंदिरात गाव मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात यावर्षी सुद्धा नारायण पांडे महाराज भगत यांचे हस्ते श्रीशेत्र महादेव घाट कन्हान नदी येथे पूजा, आरती करून जलकलस यात्रेला सुरुवात करण्यात आली जल कलश यात्रेने आणलेले जल सार्वजनिक माता माय मंदिरात मूर्तीचे जलअभिषेक करून सार्वजनिक पूजेला सुरुवात करण्यात आली.
सार्वजनिक पूजा पार पडल्यावर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जल कलेश यात्रेत अनिल मुपीडवार ,पोलीस पाटील बबन काळे ,बाबाराव पुंजारवार ,गणपतराव धारमरे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण लुटे ,बाबुलाल सरीले, दिनेश महाले ,रामचंद कुथे, अनिल चव्हाण, सखुबाई ठाकरे ,सरुबाई उईके ,कुंदा काटोले, रेश्माबाई वाढवे, प्रमिला शेंद्रे ,कुसुम कोलतेवार सह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.