संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसात शेतातील धुऱ्यावरून पळून जात असलेल्या शेळ्यांना विद्दुत खांबाचा स्पर्श होऊन झालेंल्या विद्दुत धक्क्याने तिन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 28 मे ला सायंकाळी 5 दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार शेळीपालन केंद्रामालक एकनाथ बरडकर यांच्या शेळी पालन केंद्रातील कर्मचारी महेंद्र झाडे हे शेळ्या चारून शेळीपालन केंद्रात येत असता अचानक वादळ वारा पाऊस आल्याने पळापळ करीत राजाभाऊ ठाकरे यांच्या शेतातील धुऱ्यावर असलेल्या विद्दुत खांबाचा तीन शेळ्याना विद्दुत धक्का लागल्याने तिन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.यासंदर्भात पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली आहे.