अमरावती :- नवनीत राणा यांचे अवैध जात प्रमाणपत्र वैध ठरविणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत दुर्दैवी असून S.C. साठी राखीव असलेल्या मतदार संघात आता वेगळ्या अर्थाने S.C. कोट्यातून उमेदवार मिळाला आहे असा या निकालाचा अर्थ असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची संपूर्ण खंडपीठा द्वारे पुनर्मिमांसा होण्याची गरज असून नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात जिंकल्या असल्या तरी लोकांच्या न्यायालयात त्या निश्चित पराभूत होणार आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पचण्यासारखा नाही म्हणून अन्न असो वा निकाल न पचल्यास ते अजीर्णाला निमंत्रण ठरते , भाजपला आता या अजीर्णाला सामोरे जावे लागणार असून मतदारच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला रद्दबादल ठरविणार आहे.
हा तर S.C.कोट्यातील उमेदवार – दिलीप एडतकर प्रदेश काँग्रेस प्रवक्ता
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com