कामठी तालुक्यातील बहुतांश भागातील पेरण्या खोळंबल्या 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यात पावसाचा अनियमितपणा असल्यामुळे कामठी तालुक्यात पावसाच्या असमतोलपनामुळे काही ठिकाणी काही भागात तुरळक पाऊस पडल्याने तसेच काही ठिकाणी मुबलक प्रमानात पाणी नसल्याने व पाण्याचा निचरा न झाल्याने बहुतांश भागातील पेरण्या खोलंबल्या आहेत.तर बहुतांश भागात पिकाचे आयुष्य तुरळक पावसावर अवलंबून आहे. पिकाच्या ऐन फुलोऱ्याच्या हंगामात कमी जास्त पावसामुळे मालाच्या उताऱ्यावर परिणाम होण्याचा अंदाज आहे.

मृग नक्षत्र कोरडा गेल्यानंतर पावसाने अनियमितता सुरू केली.काही दिवस पाऊस पडला मात्र त्या परिसरातील बंधाजवळील पाण्याचा निचरा न झाल्याने पेरण्या झाल्या नाहीत तर काही ठिकानी झालेल्या तुरळक पावसामुळे पिके तग धरून आहेत.तर काही ठिकाणी पावसा अभावी पिकाखालील जमिनीला भेगा पडत आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पांढरकवडा बनले खड्डांचे शहर – अनेक रस्तांवर खड्डेच खड्डे नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष 

Tue Jul 16 , 2024
पांढरकवडा :- पांढरकवडा हे शहर सध्या खड्डयांचे शहर म्हणून ओळखले जाते, कारण शहरातील अनेक रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. हे खड्डे वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत आणि अपघाताची शक्यता वाढवित आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांची हानी, प्रवाश्यांचे दुखणे, आणि वाहतुकीतील अडथळे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. यामुळे शहरवासींना दररोजच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक रस्ता हा अनेक खड्ड्यांनी भरलेला आहे ज्यामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com