1 ऑक्टोबरपासून शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ

नागपूर :-  आपल्या शेतातील मालाला जेव्हा भाव येईल तेव्हा विकता यावे यासाठी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना शासनाने सुरु केली आहे. या हंगामासाठी 1 ऑक्टोबरपासून शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याचा उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समित्यामार्फत “शेतमाल तारण कर्ज योजना” राबविण्यात येते. सन 2022-23 या हंगामातील शेतमाल तारण कर्ज योजनेस दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होत आहे. शेतकऱ्याच्या मालाला तारण देणारी महत्वकांक्षी अशी योजना असून या योजनेतून तुर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान) करडई, ज्वारी, बाजारी, महा, गहू, वाघ्याघेवडा (राजमा) बेदाणा, हळद, काजू बी व सुपारी आदीना लाभ दिला जातो. शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समितीकडे तारण ठेवू शकतात. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करुन वाढीव रक्कम शेतकऱ्यांना परत मिळते. अशा सुविधांमुळे शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंरोजगार मेळावा

Thu Sep 22 , 2022
नागपूर :-  जिल्ह्यातील स्वयंरोजगार इच्छुक सुशिक्षित युवक-युवतीकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंरोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात नागपूर जिल्ह्यातील सर्व महामंडळे तसेच शासनाचे विविध विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती एका छत्राखाली उपलब्ध होण्याकरीता स्वयंरोजगार मेळावा घेण्याचे योजिले आहे. हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर प्रशासकीय इमारत क्र. 2 मध्ये दुसरा माळा सिव्हील लाईन, नागपूर येथे 24 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com