मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमास एन वॉर्ड मधून उद्यापासून सुरुवात : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :- मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाची उद्या, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ‘एन वॉर्ड’ मधून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

गुरुवार दि. ०६/१०/२०२२ रोजी एन वॉर्ड, शुक्रवार दि.०७/१०/२०२२ रोजी आर साऊथ वॉर्ड येथे, शनिवार दि.०८/१०/२०२२ रोजी के ईस्ट वॉर्ड, सोमवार दि.१०/१०/२०२२ रोजी आर सेंट्रल वॉर्ड, बुधवार दि.१२/१०/२०२२ रोजी एल वॉर्ड, गुरुवार दि. १३/१०/२०२२ रोजी एस वॉर्ड, शुक्रवार दि.१४/१०/२०२२ रोजी एम ईस्ट वॉर्ड, शनिवार दि.१५/१०/२०२२ एच वेस्ट वॉर्ड, सोमवार दि.१७/१०/२०२२ रोजी आर नॉर्थ वॉर्ड येथे, बुधवार, दि.१९/१०/२०२२ रोजी पी नॉर्थ वॉर्ड येथे, गुरुवार दि.२०/१०/२०२२ रोजी पी साऊथ वॉर्ड येथे, सोमवार दि.३१/१०/२०२२ रोजी एम वेस्ट वॉर्ड येथे, बुधवार दि.०२/११/२०२२ रोजी के वेस्ट वॉर्ड येथे, गुरुवार दि.०३/११/२०२२ रोजी एच ईस्ट वॉर्ड येथे, शुक्रवार दि.४/११/२०२२ रोजी टी वॉर्ड येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. नियोजित दिवशी सकाळी १० वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात हा उपक्रम वरील प्रमाणे सुरू होणार आहे.

यावेळी नागरिकांना आपल्या समस्या पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून सांगता येतील व ती समस्या सोडवण्यासाठी अर्ज ही देता येणार आहे. अर्जामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. थेट बाधित व्यक्ती अथवा समूहाकरिता / Directly Affected Person or Group, अर्जदाराचे नाव / Name :,मोबाईल क्रमांक / Mobile No., संपूर्ण पत्ता / Full Address :, ई-मेल आयडी / Email Id :, लोकसभा क्षेत्र / Loksabha Area, विधानसभा क्षेत्रसभा / Assembly Area, बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड / BMC Ward, निवडणूक वॉर्ड क्रमांक / Election Ward No, तक्रार – समस्या विभाग / Complaint Department : 17 A) जिल्हाधिकारी B) तहसीलदार C) बृहन्मुंबई महानगरपालिका D) पोलिस E) रेल्वे)आरोग्य G) SRAH) म्हाडा 1) स्वच्छता ) रेशनिंग K) महानगर गॅस L) अन्य लेखी समस्या / तक्रार नागरिकांना सविस्तरपणे देता येईल.

तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. यासाठी वरील नमुन्यांमध्ये अर्ज देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त ज्या नागरिकांच्या इतर काही लेखी समस्या असतील. त्याचे देखील निवेदन देता येईल, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमी विकासाच्या 190 कोटींच्या आराखड्याला 15 दिवसात मान्यता - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Oct 6 , 2022
• धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाला भरपावसात लाखो अनुयायांचे अभिवादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती नागपूर :-  गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात लक्षावधी अनुयायांसमोर ते बोलत होते. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!