विटंबना करतांना आव्हाडांची बुद्धी शेण खायला गेली होती का – जयदीप कवाडे

– सरकारने आव्हाडांना तात्काळ अटक करावी : पीरिपा

– ‘पीरिपा‘च्या निषेध आंदोलात पोस्टरचे दहन

नागपूर/मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या क्रांती भूमित निव्वळ प्रकाश झोतात येण्यासाठी विटाळलेले राजकारण करण्याचे काम शरद पवार गटामधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड काल करून दाखवले. काँग्रेसी विचारसरणीचा अवलंब करणारे शरद पवारांनी गेली अनेक दशके कायम आंबेडकरवादाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विरोध केला. आज त्यांच्याच पावलावर चालून आव्हाड हे बाबासाहेबांचा नावाने फडतोस राजकारण करीत आहे. आपल्या भाषण आणि माध्यमात ज्ञान पाझरविणारे आव्हाड हे उत्कृष कलाकार म्हणून प्रकाश झोतात येण्याचे काम करीत असतात. ऐकीकडे महामानवाचे अनुयायी असल्याचा बुरखा घालून आंदोलन करायचे आणि दुसरी कडे फोटोची विंटबना करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम आव्हाडांनी केले. महाड आंदोलनात विटंबना करतांना आव्हाडांची बुद्धी ही शेण खायला गेली होती का? असा सवाल करीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांनी महाराष्ट्र सरकारने तात्काळ आव्हांडावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

सीताबर्डी, आनंद नगर येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात पिरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात आव्हाडाच्या पोस्टरचे जाळून व जोडे मारून आंदोलन करण्यात येणार. पीरिपातर्फे आव्हाडांच्या गैरकृत्याचा तिव्र निषेध नोंदवितांना जयदीप कवाडे बोलत होते. आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, नागपुर शहर अध्यक्ष कैलास बोम्बले, जेष्ठ नेते अजय चव्हाण, भीमराव कळमकर, रवि बाणमारे, पलाश थवरे, हिमांशु मेंढे, सुमित डोंगरे, डेनी सोमकुवर, गौरव जवदवार, सनी कन्ना, आयुष दाहिवले, प्रजोत कांबळे, दिलीप पाटिल, विनय बनसोडे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, काँग्रेसी विचारसनीचे अनुसरण करणारे हे नेहमीच बाबासाहेबांचा विरोध करीत आहेत. संविधान निर्माताच्या चळवळीचे केंद्र असलेल्या महाडमध्ये आंदोलन करून आपण आंबेडकरवादी असल्याची सर्कस काल जितेंद्र आव्हाडांनी केली. आंदोलन करण्याची भूमिका ही स्पष्ट असावी ज्यावेळी त्यांनी मनस्मृतीचा विरोध करण्याऐवजी महामानवाचा विरोध करण्याचाच घाट त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे. यामुळे संपूर्ण समाजात असंतोष निर्माण करण्याचे काम आव्हाडांनी केले आहे. असे कृत्य करतांना त्यांच्या डोक्यात आणि ओठात काय हे दिसून आले. त्यामुळेच अशी संतापजनक कृती आव्हाडांनी केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आव्हांडावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहे. सरकारने या घटनेची गांभीर्याने घेत तात्काळ अटक करावी अन्यथा पीरिपा राज्यभरात तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही कवाडे यांनी दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुकेश श्रीकृष्ण मते यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी - मेघा मते (आई )

Fri May 31 , 2024
– सख्ख्या मोठ्या मुलांच्या त्रासामुळे आईचा व लहान मुलांचा कधीही जीव जाऊ शकतो ! – सचिव मेघा मते नी न्यायासाठी परिषदेत घेतली धाव ! नागपूर :- ग्रामोद्वार विद्या प्रसारक शिक्षण संस्था हिंगणा येथील नागपूरच्या सचिव अधिकृत पदावरील मेघा श्रीकृष्ण मते तसेच यांच्या अंतर्गत अहिल्यादेवी होळकर अनुदानित आदिवासी आश्रम शाळा उखळी येथील दोन स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना तिच्या मोठ्या मुलाने नोकरीतून कार्यमुक्त केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com