आ. टेकचंद सावरकरांच्या विकास कार्याचा दणदणीत विजय

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले असुन कामठी, मौदा विधानसभा मतदार संघातील एकुण ४२ क्षेत्रात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली त्यात२७ ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी समर्थित उमेदवारां चा विजय झाला.

कामठी क्षेत्रात १० पैकी चिकना, कवठा, बाबुळखेडा , नेरी,आणि वरंभा अशा एकुण ५ ठिकाणी तर मौदा क्षेत्रातील इंदौरा, आदासा,पिंपरी, बोरगाव, अडेगाव, घोड मुंढरी , पिंपळगाव , आजनगाव , भांडेवाडी , तोंडली , बेरडेपार, नाना देवी ,लापका , खराडा ( पू) अशा २४ पैकी १५ तर नागपुर ग्रामिण अंतर्गत सालई गोधनी , विहीरगांव , कळमना, हुडकेश्वर, पांजरी लोधी, वेळा हरिशचंद्र, चिकना अशा ८ पैकी ७ जागा अशा एकुण २७ ग्रामपंचायतीत भा ज पा समर्थित उमेदवारांचा दणदणीत विजय झाला संपूर्ण क्षेत्रात आ टेकचंद सावरकर यांनी गावोगावी केल्याला विकास कामाची ही पावती असल्याचे म्हंटले जाते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपाने ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या

Mon Nov 6 , 2023
– प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कार्यकर्त्यांचे अभिनंदन मुंबई :-राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकत दणदणीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीत भाजपा – शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने १४०० पेक्षा अधिक जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com