नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन

नागपूर :- आदिशक्तीची आराधना करणा-या ‘नवरात्र’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दिक्षा दिलेल्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ च्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी धार्मिक उत्सवांसाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, सार्वजनिक उत्सवांना घरगुती दराने उपलब्ध असलेली अधिकृत व तात्पुरती वीजजोडणी घेत संभाव्य वीज अपघात टाळून सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महवितरणच्या अखत्यारीतील भागात सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीज दराप्रमाणे वीजदर निश्चित केले आहेत. धार्मिक उत्सवांकरिता अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचा दर घरगुती वीजदराच्या समकक्ष ठेवण्यात आला आहे. नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा महाप्रसाद, रवण दहन तसेच धम्मचक्र प्रवर्त्न दिनानिमित्त्तने करण्यात येणारी रोषणाई, भोजनदान व इतर कार्यक्रमासाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक 24 तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक 1912, 18002123435, किंवा 18002333435 यावर संपर्क साधावा अथवा 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुरक्षा महत्वाची

· नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतरही धार्मिक आयोजनादरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

· गरबा, जागर आदिचे आयोजन विद्युत यंत्रणेपासून लांब अंतरावर करावे.

· दस-या प्रसंगी होणारे रावण दहन हे मोकळ्या मैदानात आणि वीज यंत्रणेपासून लांब करावे, फ़टाक्यांची आतिषबाजी करतांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.

· वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब बाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकीत अपघात होण्याची शक्यता असते.

· जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानी होण्याचा धोका अधिक आहे.

· वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठीत 'होऊ द्या चर्चा'शिवसेना जागर अभियान अंतर्गत कार्यक्रम

Tue Oct 10 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जागरण अभियान अंतर्गत कामठी विधानसभा मतदार संघात सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’नागरिक संपर्क सभेचे आयोजन रविवार 8 ऑक्टोबर ला रात्री 8 वाजता बुद्ध नगर कामठी येथे करण्यात आले होते त्यानंतर रामगढ तसेच 9 ऑक्टोबर ला सैलाब नगर व छत्रपती नगर येथे करण्यात आले होते. सध्या अस्तित्वात असलेल्या केंद्र सरकार आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com