84 हजार धम्म स्कंधात बुद्धाचा विचार आहे – डॉ विनोद रंगारी

नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत व बौद्ध अध्ययन विभागात बिलासपूरच्या गुरु घासीदास केंद्रीय विश्वविद्यालय चे प्रो डॉ विनोद रंगारी यांचे 84,000 धम्मस्कंध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

आपल्या मार्गदर्शनामध्ये ते म्हणाले की बौद्धधम्म हा 84000 धम्मस्कंध मध्ये विभाजित आहे. हे 84 हजार धम्मस्कंध मानवी जीवनात सुख, शांती आणि बोध प्रदान करण्यासाठी बुद्धांनी आपल्या उपदेशातून व्यक्त केले आहेत. हे धम्मस्कंध जगाचे कल्याण करणारे आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख डॉ नीरज बोधी होते. आपले अध्यक्षीय संबोधन सादर करीत असताना डॉ नीरज बोधी म्हणाले की बुद्धांचा धम्म हा बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. 84 हजार धम्म स्कंध मध्ये बुद्धांनी बहुजन हिताचा आणि बहुजन सुखाचा मार्ग प्रशस्त केलेला आहे. ज्याचे प्रत्येक व्यक्तीने अनुकरण करणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन अशोक वाटोडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेनी झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ऊर्जा परिवर्तनासाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार

Thu Feb 27 , 2025
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात अंमलात येणाऱ्या ऊर्जा परिवर्तन योजनेतील विशेष कार्यासाठी महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवी दिल्ली येथे मंगळवारी आयोजित केलेल्या तेराव्या ग्रीन एनर्जी समिटमध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. महावितरणला या प्रतिष्ठित परिषदेत ‘स्टेट लेव्हल एक्सलन्स ॲवॉर्ड इन एनर्जी ट्रान्झिशन’ या गटात पुरस्कार मिळाला. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात राज्याचा ऊर्जा परिवर्तन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!