कन्हान :- राजस्थान,मध्यप्रदेश, छत्तीसगढ या तिन्ही राज्यात भाजपाला तर तेलंगाना कॉंग्रेसला बहुमत मिळाले याबद्दल कन्हान येथील विविध पक्षाचे पदाधिकारी याची प्रतिक्रिया दिली ज्यात
भाजप पारशिवनी तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्मे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या योजनामुळे तीन राज्यात जनतेने कौल दिले भाजप म्हणजे सत्य आहे आणि सत्याच्या मागे जनता उभी आहे आगामी लोकसभा निवडणुकी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सरकार येणार आहे .
तर कॉंग्रेसच्या माजी जि प अध्यक्षा व विद्यमान सदस्य रश्मी बर्वे यांनी सांगिलते की तेलंगानात कॉंग्रेस विजय मिळवला तर इतर तिन्ही राज्यात आलेला जनतेने भाजपला कौल जरी दिला असला तरी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस ताकतीने लढ़ेल व केंद्रात एनडीए आपले सरकार बनवेल
तसेच रिपब्लिकन भीमशक्तिचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी सांगितले की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत फरक असून लोकसभा निवडणुकीत सामान्य जनता माहगाई आणि बेरोजगार व खाजगीकरण आदि मुद्याला भाजपला समोर जावे लागेल .
तसेच आम आदमी पार्टीच्या जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर दारोडे यांनी सांगिलते की निकाल आश्चर्यजनक आहेत आणि लोकसभा निवडणूक बैलेट पेपरने घेण्यात यावी .
तसेच शिंदे गट शिवसेना नागपूर ग्रा. उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या योजनामुळे तीन राज्यात जनतेने बहुमत दिले. आता जनतेला माहीत झाले की आता देशाच्या विकासाकरीता काँग्रेसकडे कोणतेही नेतृत्व नाहीं ते नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे विकास करू शकतात आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आणि युतीचे सरकार येणार आहे.