भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध शाळा महाविद्यालय मार्फत कार्यक्रमाद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे.
नुकतेच नूतन कन्या महाविद्यालय भंडारा येथील बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयाद्वारे पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या पथनाट्यमध्ये मतदान, मतदानाचा हक्क, मतदारांची कर्तव्य याबाबत नाटकीय सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण अकरा विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. गणेशपुर भंडारा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर जनता विद्यालय तुमसर यांनी देखील या मोहिमेस उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
पथनाट्य सादर केले या पथनाट्य मध्ये जनता महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय द्वारे मतदानाचे महत्त्व पटवून दिले. प्रज्वल आग्रे, पायल कंकर, रूपाली बनसोड, सविता कांबळे, शिल्पा कांबळे, साक्षी चावके, शितल शेंडे, दिव्या काका मते या विद्यार्थिनींनी मतदानाविषयी माहिती दिली. प्राध्यापक श्री भगत, पटले मॅडम डोंगरवार मॅडम यांनी पथनाट्य सादर करण्यासाठी परिश्रम कले, असे मतदार जागृती कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा नियोजन अधिकारी मानव विकास मृणालिनी भूत यांनी कळवले आहे.