नामनिर्देशन भरतेवेळी तीन वाहनांना परवानगी

यवतमाळ :- लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी जातांना केवळ तीन वाहनांनाच परवानगी राहणार आहे.

लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सदर आदेश पारीत केले आहे. या आदेशाप्रमाणे नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनाच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश राहणार नाही.

नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्तींशिवाय अधिकच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकराच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध राहील, असे आदेशात नमूद आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ नागपूरच्या स्वप्नपूर्ती करीता अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे  - मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

Wed Mar 20 , 2024
– क्षमता बांधणी कार्यशाळेत मनपा आयुक्तांचे अधिकारी, कर्मचा-यांना मार्गदर्शन नागपूर :- स्वच्छतेचे कार्य हे कुठल्या एका विभागाचे अथवा अधिकाऱ्याचे नसून, ते सर्व विभाग आणि अधिकारी, कर्मचा-यांच्या समन्वयाने आणि सक्रीय सहभागाने केले जाणारे कार्य आहे. समन्वयाने नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यात वेळ लागणार नाही. सर्वांच्या सक्रीय सहभागाने आणि उत्तम समन्वयातून स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर या संकल्पनेची स्वप्नपूर्ती होईल आणि नागपूर शहराचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com