– पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे सरकारचे अभिनंदन
नागपूर :- महिलांना सक्षम करणारा, उद्योग आणि कृषी क्षेत्राला उभारी देणारा, सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा, दिव्यांग व दुर्बल घटकाच्या हिताचा तसेच महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रगतीपथावर नेणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, कामगार तसेच दलित आदिवासी ओबीसी आणि महिला यांसह समाजातील सर्व घटकांना सक्षम करणारा, समान न्याय देणारा आणि सर्व समाज घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे, या अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे जयदीप कवाडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकार सरकार कडून जनतेला असलेल्या अपेक्षेप्रमाणे सुखद आणि समाधानकारक अर्थसंकल्प आज सादर केला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी दृढसंकल्प करणाऱ्या या अर्थसंकल्पात अजित पवारांच्या अर्थशस्त्राचा अभ्यास आणि दूरदृष्टीचे चमक दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे, असेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे.