संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नववर्षाला सुरुवात झाल्यापासून शहरात राजकारण्यासह अनेक सामाजिक संस्थानी बॅनरबाजी सुरू केली.विशेष म्हणजे होर्डिंग लावताना पालीकेची रितसर परवानगी घ्यावी लागते यातील किती होर्डिंग परवानगीने लागली आहेत यावर न बोललेलेच बरे.
नववर्षाच्या सुरूवातीपासूनच बॅनरबाजीला उत आला आहे.या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपिकरण होत असून प्रवास्यासह नागरिकांनाही याचा त्रास होत आहे.मात्र या समस्येकडे कामठी नगर परिषदचे लक्ष का जात नाही ,असा सवाल आता शहरवासीयांमध्ये उपस्थित होत आहे.एकीकडे नगर परिषद कडून स्वच्छतेचा नारा दिला जात आहे मात्र बॅनर बाजीने पून्हा एकदा शहरातील महत्वाचे चौक ,रस्त्यावर बॅनर बाजीतून शक्तीप्रदर्शन होत आहे.
विशेष म्हणजे नगर परिषद चे अधिकारी,कर्मचारी दररोज शहरातून ये जा करतात मात्र त्यांना या बॅनर बाजीचा विसर पडला की काय?असा सवालही उपस्थित केला जात आहे.शहरातील मुख्य चौक ,रस्त्यासह प्रशासकीय इमारती समोर मोठमोठे बॅनर होर्डिंग लावून शक्तिप्रदर्शन करीत आहेत यामुळे कामठी शहर बॅनर बाजीने रंगले आहे.
File photo