समाजकार्य महाविद्यालय कामठी येथे सामाजिक न्याय दिन साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  येथील समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिवस सामजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉक्टर ओमप्रकाश कश्यप, कार्यक्रम समन्वयक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.  डॉ. ओम प्रकाश कश्यप यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा विस्तृत आलेख आपल्या भाषणातून श्रोत्यांसमोर मांडला. डॉ. रुबीना अन्सारी यांनी अध्यक्षीय भाषणातून राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय संदर्भातील कार्याचा परिचय दिला.

कार्यक्रमाचे  प्रस्ताविक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी मांडले संचालन डॉ. सविता चिवंडे यांनी केले, तर आभार प्रफुल्ल बागडे यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाला डॉ. प्रणाली पाटील, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ.मनोज होले, प्रा. शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे, डॉ. हर्षल गजभिये, प्रा.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख, शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल बागडे, उज्ज्वला मेश्राम, प्रतीक कोकोडे, शशील बोरकर, वसंता तांबडे, नीरज वालदे, राहुल पाटील  तसेच  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येरखेड्यात 'धोंडी धोंडी पाणी दे' उत्सवाची धूम

Thu Jun 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जमीन तयार केली आहे.परंतु पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी राजा निराश होऊन पावसाच्या प्रतीक्षेत बसला आहे.त्यामुळे कामठी तालुक्यातील येरखेडा गावात मेघराजाची गावपूजा करून धोंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. कामठी तालुक्यातील बळीराजाने जमिनीची मशागत करून पेरणीसाठी सुसज्ज करून ठेवली आहे.परंतु ऐन पेरणीच्या वेळेस पाऊस नाराज होऊन बसला आहे.तेव्हा पावसाची नाराजी दूर करण्यासाठी जुन्या प्रथेप्रमाणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com