संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्रातील सत्ताधारी शिंदे सरकार ही ओबीसी विरोधी असून ओबीसी समाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.ओबीसी समाजाच्या कुठल्याही मागण्या पूर्ण होत नसल्याची खंत कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रसन्ना उर्फ राजा तिडके यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
ओबीसींच्या मागण्याकडे लक्ष पुरविले असता ओबीसींचे वस्तीगृह अद्यापही सुरू झाले नाही,शासकीय पदभरती अजूनही अपूर्ण आहे,ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही .