संवेदनशील भागातील मतदान पथके रवाना

– गडचिरोलीत 68 मतदान केंद्रावर 295 मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 68 मतदान केंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 295 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3-एम.आय.- 17 आणि 4-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेस देशाचा विकास करूच शकत नाही - लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Tue Apr 16 , 2024
– मुल येथे व्‍यापारी मंडळ, सामाजिक संस्‍थांच्‍या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद चंद्रपूर :- काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी ते देशाचा विकास करू शकत नाहीत. देशाचा विकास करण्याची ताकद फक्त मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं मध्ये आहे. काँग्रेसला फक्त आणि फक्त दुष्‍ट प्रचार करता येते, देशाचा विकास करता येत नाही, अशी घणाघाती टीका चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com