![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या वतीने गुरूवारी (ता.२८) सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील डॉ. आंबेडकर चौक, वर्धमान नगर परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी महापौरपदी असताना पौर्णिमा दिवस या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरूवात केली होती.
गुरूवारी जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात परिसरातील नागरिकांनीही सहभाग नोंदवित जनजागृती कार्य केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शितल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, काजल पिल्ले, पार्थ जुमडे आदींनी जनजागृती केली. त्यांना परिसरातील नागरिक यांच्यासह सर्वश्री भोलानाथ सहारे, उपेंद्र वालदे, अपूर्व डे, प्रणिता लोखंडे, विजयकुमार अग्रवाल, सचिन चंदनखेडे, चित्रा माकडे, मनपाचे आर.यू. राठोड, राजेश भाजीपाले आदींनी सहकार्य केले. यावेळी स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.