नागपूर :- बीजेपी सरकारने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय करदात्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. बीजेपीचा हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे केवळ धूळफेक असून नागरिकांची फसवणूक आहे. मोदी सरकार महागाई कमी करतील याची सर्वांना मोठी उत्सुकता होती पण निराशा झाली. महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करतील अशी अपेक्षा मोदी सरकारकडून होती. मात्र मोदी सरकारने महागाई कमी करण्यासाठी या अंतरिम अर्थसंकल्पात काहीही केलेले नाही,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांचे मत आहे.
मोदी सरकारने संसदमध्ये अर्थसंकल्प सादर केला तो नागरिकांसाठ निराशाजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून समाजातील विविध घटकांना न्याय देणारा असल्याचे अर्थसंकल्पात काहीही नाही. सामाजिक न्याय देणारी योजना नाही.आदिवासी,ओबीसी ,दलित मागासवर्गीय समाजाची या अर्थसंकल्पात घोर निराशा झालेली आहे,असे आदिमच्या नेत्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड.नंदा पराते यांचे मत आहे.
बीजेपी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात सामाजिक न्याय देणारी तरतूद नाही, युवकांना रोजगाराची संधी कशी देणार? याबाबत योजना नाही.शेतकऱ्यांच्या शेतीमालास भाव नाही. महिलांना न्याय देणारी योजना नाही. गरिबांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी योजना नाही.यामुळे युवा,महिला,शेतकरी व गरीबांची फसवणूक करणारा अंतरिम अर्थसंकल्पात घोर निराशा झाली आहे. मोदी सरकारने संसदमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, तो नागरिकांसाठी निराशाजनक आहे अशी आदिमच्या नेत्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांनी टीका केली आहे.