नवउद्योजकांसाठी रु.50 लाखापर्यंत कर्ज योजना

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी -प्र.जिल्हाधिकारी धनाजी पाटील

गडचिरोली :- शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षीत युवक युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम ही योजना राज्य शासनामार्फत राबविली जाते. जिल्हयातील युवकांनी या योजनेचा फायदा घेवून जिल्हयात स्वयंरोजगार व रोजगाराच्या माध्यमातून विकासाला चालना द्यावी असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लाभार्थ्यांचे मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज विहित कागदपत्रांसह सादर करावयाचा आहे. अर्ज मंजुरीनंतर शासनाकडून मिळणारे अनुदान उद्योग संचालनालयाव्दारे त्यांनी निर्धारित केलेल्या बँकांमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. ही योजना नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी बँकामार्फत दिल्या जाणा-या कर्जात संलग्न अनुदान योजना आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उत्पादन स्वरुपाच्या उद्योगास प्रकल्प मर्यादा रुपये 50,00,000/- लक्ष असून सेवा व कृषी पूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी कमाल रुपये 20,00,000/- लक्ष आहे. बँक व्दारा मंजुर शहरी भागातील राखीव प्रवर्गातील यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, ना.मा.प्रवर्ग, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक यांना प्रकल्पास 25% तर अराखीव प्रवर्गास 15% अनुदान देय राहणार आहे, तर ग्रामीण भागातील राखीव प्रवर्गास 35% तर अराखीव प्रवर्गास 25% अनुदान देय राहणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात येत असून, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आलेले कर्ज प्रकरणे जिल्हा कार्यबल समितीच्या शिफारसीने 67 कर्ज प्रकरणे 11 मे,2023 रोजी सरकारी बँकेसह खाजगी सहयोगी बँकांकडे सादर करण्यात आले आहे. बँकेव्दारा कर्ज मंजुर उमेदवारांना प्रशिक्षणाची सोय सुध्दा करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक युवक युवतींनी जिल्हा उद्योग केंद्रास संपर्क साधावा व मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

भावपूर्ण वातावरणात मेजर कौस्तुभ राणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मरणोपरांत प्रदान

Mon May 22 , 2023
डॉ. अभय करंदीकर, ‘मैत्री परिवार’ व प्रदीप परुळेकर देखील स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने सन्मानित सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल रमेश बैस  मुंबई :-स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. ते द्रष्टे समाज सुधारक व जातीभेदाचे कट्टर विरोधक होते. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारकांच्या योगदानाकडे डोळेझाक करण्यात आली. खोट्या सिद्धांताच्या आधारे अनेक क्रांतिकारकांना बदनाम […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com