नागपूर : ‘हर घर जल से नल’ या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दीचे काम सुरू आहे. त्याअनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन संदर्भात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.
जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी 26 जानेवारीच्या ग्रामसभा यशस्वी पार पाडाव्यात व ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्याचे व लोकसहभागातून योजना यशस्वी करण्याचे आवाहन शर्मा यांनी केले आहे.