नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशातील गरीब, वंचित आणि सामान्य व्यक्ती न्याय मागू शकतो. संविधानामुळेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मागण्याचा अधिकार सर्वांना मिळाला आहे. देशाची लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
या संविधान रक्षणाचा लढा आणि असाच लढणार आहोत, अशी ग्वाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमत्त दीक्षाभूमीवर भेट देत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी देशातील सर्व नागरिक आणि अनुयायांना जयंती निमित्य शुभेच्छा दिल्या.