मुंबई :-राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुलोचना दिदी प्रेमळ आईचे प्रतिरुप होत्या. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. पडद्यावर आणि पडद्याबाहेर देखील त्या सुहृद व्यक्ती होत्या. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या आप्तेष्टांना कळवतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.