अखेर चरणसिंग ठाकुरांच्या प्रयत्नाने मरामाय नगरातील रहिवाश्यांना दिलासा, रेल्वे प्रशासनाने अतिक्रमनाच्या नोटीस मागे घेतल्या

काटोल :- काटोल नगर परिषद क्षेत्रातील मारामाय नगर व अर्जुन नगर मधील रेल्वे लाईनच्या दोन्हीं बाजूला असलेल्या रहिवासी नागरिकांना रेल्वे सीमारेषेच्या आत असल्याचे कारणांस्तव 10 दिवसाचे आत घरे खाली करण्याकरिता नोटीस बजावण्यात आल्या होत्या,नागरिकांनी नागपूर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

चरणसिंग ठाकूर यांनी विलंब न लावता 30.11.2022 ला मंडल प्रबंधक मध्य रेल्वे नागपूर यांना पत्र लिहून भेट घेतली असता वरिष्ठ मंडल अभियंता मध्य रेल्वे नागपूर यांच्यासोबत बैठक घेऊन कागदपत्रांद्वारे दोन्ही नगरातील रहिवासी यांची घरे अतिक्रमनात येत नसल्याचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर याांना चरणसिंग ठाकूर यांनी लक्षात आणून दिले.

रेल्वे वरिष्ठ अभियंता प्रथम अग्रवाल यांनी मान्य करून तडकाफडकी निर्णय घेऊन ३७ नगरीकांच्या अतिक्रमणं नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेऊन त्याच तारखेला सहाय्यक मंडल अभियंता यांना पत्राद्वारे कळविले असून उर्वरित नागरिक,न प प्रशासन यांचेसोबत त्याच जागेवर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाने चरणसिंग ठाकूर यांना आश्वासन दिले बैठकीला भाजपा अनु जाती जमाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री देविदास कठाने, कृ ऊ बा समिती,संचालक किशोर गाढवे, माजी नियोजन सभापती राजू चरडे उपस्थित होते.

चरणसिंग ठाकूर यांनी आज दिनांक 1 डीसेबर 2022 ला काटोल येथील कार्यालयात मारामआय व अर्जुंनगर येथील नागरिकांसोबत बैठक घेऊन रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण नोटीस मागे घेतल्याचे पत्र सुपूर्त करून आपले घरे कोणीही पाडणार नाहीत असा विश्वास चरणसिंग ठाकूर यांनी दिला

याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, कृ ऊ बा संचालक,दिनेश ठाकरे,शहर अध्यक्ष विजय महाजन,महामंत्री कोमल देशमुख,माजी नगराध्यक्ष, भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष,माजी नगराध्यक्षा  वैशाली दि ठाकूर , जेष्ठ नागरिक अशोक काळे,प्रकाश देशभ्रतार उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनरेगा आयुक्तांची थेट चालू कामाच्या स्थळी जाऊन मजुरांची भेट

Fri Dec 2 , 2022
नागपूर :-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचयात स्तरावर विविध वैयक्तिक लाभाची व सार्वजनिक स्वरुपाचे कामे केली जातात. मनरेगा अंतर्गत सध्या राज्यात 38 हजाराहून अधिक कामे सूरु आहेत. कळमेश्वर तालुक्यातील म्हासेपठार व लोहगड ग्रामपंचायतीअंतर्गत चालू असलेल्या काही कामांना मनरेगा आयुक्त शान्तनु गोयल, (भाप्रसे ) यांनी आकस्मिक भेट दिली.सदर भेटी दरम्यान आयुक्तांनी म्हासेपठार व लोहगड ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवड, पेव्हर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com