पूर, नैसर्गिक आपत्ती अध्ययन करण्यास सहकार्य करा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांचे आवाहन

– नागरी स्थानिक नियोजनासाठी नागपूर शहरातील पूर, नैसर्गिक आपत्ती, जोखीम, मूल्यांकन आणि भू-स्थानिक विश्लेषण यावर मनपात संयुक्त कार्यशाळा

नागपूर :- नागपूर शहरातील नाग नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारी व नदीस पूर येण्यास कारणीभूत असणारे विविध कारण तसेच वातावरण बदलामुळे वाढते तापमान यावर करण्यात येणाऱ्या विश्लेषण तसेच पूर, नैसर्गिक आपत्ती संदर्भात अध्ययन कार्यासाठी लागणारी अद्यावात माहिती देण्यसाठी सर्व विभागांनी महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्त एजेंसीला सहकार्य करावे असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले.

नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या अध्यक्षतेखाली “नागरी स्थानिक नियोजनासाठी नागपूर शहरातील पूर, नैसर्गिक आपत्ती, जोखीम, मूल्यांकन आणि भू-स्थानिक विश्लेषण” या विषयावर शुक्रवारी (ता.९) रोजी संयुक्त कार्यशाळेचे (Joint Workshop on Multi-Hazard Risk Assessment and Geo- spatial Analysis of Flood Risk in Nagpur City for Urban Local Planning) आयोजन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात नागपूर शहरात दरवर्षी उत्पन्न होणारी पूरसदृश्य परिस्थिती तसेच विविध प्रकाराचे आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्याचा दृस्टिने आयोजित कार्यशाळेत यूएनडीपी च्या मार्गदर्शनाखाली अॅल्यूव्हियम इंटरनॅशनल व अॅल्यूव्हियम कन्सल्टिंग इंडिया आणि रिस्क मँनेजमेंट सोल्युशन इंक यांच्याद्वारे नागपूर शहरासाठी “जिओ फ्लड मॉडेलिंग” व “उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण” राबविण्याकरिता व माहिती पुरविण्यासाठी चर्चा सत्र घेण्यात आले. याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, यूएनडीपीच्या शहर समन्वयक आरुषा आनंद, मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त हरीश राऊत, नागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर, मनपाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, मनपा अग्निशमन विभागाचे उप अग्निशमन अधिकारी सतीश राहटे, जगदीश बैस, अरुण भोपळे, मनपाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इजराईल, व्हीएनआयटीचे प्राध्यापक डॉ. राजश्री कोठारकर, प्रादेशिक हवामान विभागाचे गौतम नगराळे, नीरीचे डॉ. कुमार अम्रित, डॉ. साधना जैन, विनय त्रीकोलवार, आरएमएसआयचे मुरलीकृष्णन, अॅल्यूव्हियमचे पार्थ गोयल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रारंभी यूएनडीपी च्या शहर समन्वयक आरुषा आनंद यांनी कार्यशाळे विषयी माहिती दिली, महाराष्ट्रासाठी आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासन व जीओएम-यूएनडीपी कार्यक्रमांतर्गत शहरी घटकामधील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मॉडलिंग उपक्रम तयार करण्यात येणार आहे. याकरिता नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांसाठी जोखीम मूल्यांकन आणि भू-स्थानिक विश्लेषण” कार्य केले जाणार असल्याचे आरुषा आनंद यांनी सांगितले.

या विश्लेषण कार्याद्वारे शहरांसाठी भौगोलिक स्थानिक पूर मॉडेल तयार करणे, पूराची मूळ कारणे शोधने, बाधित होणारे सकल भाग, पूराचे जुने ठिकाण इत्यादी ओळखण्यास मदत करणे आणि पूर परिस्थितीमध्ये बचाव करण्यास आधारभूत दस्तऐवज व माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारी व अभ्यासासाठी शहर स्तरावरील आवश्यक विभागासंबंधी माहिती व अधिकाऱ्यांचा सहभाग घेत उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेतील विविध विभागामधील डाटा आणि माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कार्यशाळेत आरएमएसआयचे मुरलीकृष्णन आणि अॅल्यूव्हियमचे पार्थ गोयल यांनी संगणकीय सादरीकरण करीत नागपूर शहरातील नाग नदी व उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण कार्याच्या पद्धती विषयी माहिती दिली. तसेच भूकंप, अतिवृष्टीमुळे आलेला पूर, उष्णतेची लाट, चक्रीवादळ, भूस्खलन, शहरी आग, औद्योगिक प्रदूषण, महामारी या बहु जोखीम आपत्ती संदर्भात नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीनही शहरात विश्लेषण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच विश्लेषणाची माहिती पुस्तिका, नकाशे व सर्व समावेश आपत्ती व्यवस्थापक नियोजन शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चरणसिंह, नरसिंह राव, स्वामिनाथन यांना भारतरत्न

Sat Feb 10 , 2024
-वर्षात तिघांना देण्याचा नियम, यंदा 5 जणांना सर्वोच्च नागरी सन्मान दिल्ली :- देशासाठी योगदान देणाऱ्या आणखी तीन भूमिपुत्रांना भारतरत्न देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यात देशाच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्यासह देशाची माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांचा समावेश आहे. देशातील या 3 भूमिपुत्रांना भारतरत्न देण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com