संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 9 :- उद्या 10 एप्रिल ला रामनवमी तसेच 14 एप्रिल ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.तेव्हा हे दोन्ही उत्सवाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत हे दोन्ही उत्सव शांततेत पार पाडा असे आव्हान डीसीपी मनीष कलवानिया यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन सभागृहात आयोजित बैठकीत व्यक्त केले.
या बैठकीला श्री राम नवमी शोभायात्रा समिती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम समिती च्या पदाधिकारी सह प्रतिष्ठित नागरिकांना ही बोलविण्यात आले होते.यावेळी दोन्ही समित्यांची बैठक घेवून दोघांनाही कार्यक्रमाच्या सूचना देण्यात आल्या.यात डीजे वाजवताना शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार आवाज ठेवण्यात यावा.
दोन्ही कार्यक्रम शांततेत व कुठलेही गालबोट न लागता पार पाडावे, शिवाय कार्यक्रमा दरम्यान काही लोक नशापाणी करून कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना वेळीच सावध करून पोलिसांच्या स्वाधीन करावे.दोन्ही उत्सव आपलेच आहेत याचे भान ठेवून कार्यक्रम शांततेत पार पाडावे असे आव्हान केले.
ही बैठक डीसीपी मनीष कलवानिया व एसीपी यांच्या मूख्य उपस्थितीत घेण्यात आली होती.बैठकीला श्री राम नवमी शोभायात्रा समिती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम समिती चे मुख्य पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)