संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्यानी आता विद्दूत डी पी च्या ऑईल चोरीकडे आपला मोर्चा वळविला आहे ज्यामुळे ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून बहुधा गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.एकदा गेलेला वीज पुरवठा आठ आठ दिवस सुरळीत होत नाही त्यामुळे ग्रामवासीयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ऑइल चोरीमुळे गावात विज पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागत आहेत त्यातच शेतीचे कामे सुरू असून वीज पुरवठ्या अभावी शेतीकामे रखडलेली आहेत.रात्री अंधारात झोपले असता सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा धोका निर्माण झाला आहे तेव्हा विद्दूत विभागाने यावर तात्काळ उपाययोजना शोधून वीज पुरवठा सुरळीत करावे अशी मागणी केम ग्रा प चे सरपंच अतुल बाळबुधे यांनी केली आहे.