पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना काळजी घ्यावी – डॉ.बी.एन.पाटील

– ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांची मुलाखत

मुंबई :- राज्यात पावसाला सुरूवात झाली असून पर्यटकांमध्ये या आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

आपल्या राज्याला नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक तसेच भौगोलिक पर्यटनाची संपदा विपुल प्रमाणात लाभली आहे. राज्यातील पर्यटनाला जगभरात ओळख निर्माण करून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संचालनालयामार्फत विविध उपक्रम, योजना आणि महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे, पर्यटकांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, ग्रामीण भागातील पर्यटनाचा विकास, पावसाळी पर्यटन करताना घ्यावयाची खबरदारी अशा महत्वपूर्ण विषयांवर पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन. पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.12, गुरुवार दि.13 आणि शुक्रवार दि. 14 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्योग मंत्री उदय सामंत दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

Tue Jul 11 , 2023
नागपूर :- राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत 12 व 13 जुलै रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. उद्या (दिनांक 12 जुलै 2023) रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे: सामंत 12 जुलै रोजी अमरावतीहून शहरात दाखल होणार आहेत. याच दिवशी दुपारी 4.30 वाजता हॉटेल सेंटर पॉइंट येथे श्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 बाबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com