संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
कामठी :- नवी कामठी भागातील प्रभाग 15 आणि 16 मधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सर्वासाठी घरे प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत असून या योजनेला गती देण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे अश्या मागणी चे निवेदन नगर परिषद चे प्रशासक श्याम मदनूरकर याना आज दुपारी बुधवारी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी सोपविले प्रशासक श्याम मदनूरकर यांच्या अनुपस्थितित उप मुख्याधिकारी नितिन चव्हाण यांनी निवेदन स्विकारले प्रभाग 15 आणि 16 मधे जवळपास 250 नागरिकाना तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या 22 पट्टे धारकांना घरकुल बांधुन देण्यात आले परंतु अद्यापही शेकडो नागरिकाना घरकुल चा लाभ मिळाला नाही . गत दोन वर्षापासून कोरोना च्या नावाखाली प्रधानमंत्री आवास योजने चे काम ठप्प आहे असा आरोप निवेदनातून करण्यात आला.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात माजी नगरसेवक प्रतिक पडोळे,विक्की बोंबले, जितेंद्र खोबरागडे, बिरजु चहांदे, मोहन निर्मलकर, रविंद्र मरई,दिनेश खेडकर, सुनिल वक्कलकर, अरविंद चवडे, राजेश पाटील, नामदेव बाराहाते, जागेश्वर गोंडाने यांचा समावेश होता.