बँकांनी प्राथमिक क्षेत्रांतर्गत व्यावसायीक व मुलभूत कर्जांना प्राधान्य द्यावे – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

– जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीचा आढावा

यवतमाळ :- बॅंकांनी प्राथमिक क्षेत्रांतर्गत व्यावसायीक व मुलभूत कर्जांचे प्राधान्याने वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केल्या. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीचा आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अग्रणी बॅंक प्रबंधक अमर गजभिये, रिजर्व बॅंकेचे प्रबंधक हर्षल चितळीकर, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी प्रमोद लहाळे, स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक कौस्तव चक्रवर्ती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुशील गरुड, सहाय्यक निबंधक अर्चना माळवे, बँक ऑफ महाराष्ट्रचे अविनाश महाजन, बँक ऑफ इंडियाचे सारंग चौधरी, युनियन बँकेचे प्रतीक कुमार, कोकण ग्रामीण बँकेचे पवन हेमनानी, आरसेटीच्या संचालक श्रीती शेंडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी प्रायोजित उपक्रम व प्राथमिक क्षेत्रातील कर्ज वाटपाचा आढावा जिल्ह्यात या आर्थिक वर्षात ३ हजार ९७६ कोटीचे कर्ज वाटप झालेले आहे. प्राथमिक क्षेत्राला ३ हजार ६८ कोटीचे व अप्राथमिक क्षेत्रास ९०८ कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. अन्य प्राथमिक क्षेत्रामध्ये १८७ कोटीचे, सुक्ष्म उद्योग क्षेत्राला ७४६ कोटीचे वाटप करण्यात आले. यावेळी पिककर्ज वाटपाचा आढावा देखील घेतला. जिल्ह्यात खरीप हंगामाकरीता आतापर्यंत १ हजार ७१० कोटीचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे.

उमेद अंतर्गत बचतगटांना कर्ज वाटप, माविम व एनयुएलएम अंतर्गत बचतगटांना निर्धारित लक्षांकाचे कर्ज वाटप, विविध शासकीय योजनांची कर्ज प्रकरणे, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केसीसी संबंधी जनजागृती करून त्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना बैठकीत सर्व बॅकांना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

विविध महामंडळांच्यावतीने लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. योजनेंतर्गत प्राप्त होणारे कर्ज प्रकरणांचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या. केंद्र शासनाच्या पीएमएफएमई योजनेंतर्गत बॅकांना जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करावे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सर्वसामान्य बेरोजगार युवकांना उद्योजक, व्यावसायिक बनविणार उपक्रम आहे. बॅंकांनी या योजनेच्या प्रस्तावांना प्राधान्य द्यावे. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाच्यावतीने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत बँकांना राष्ट्रीय पशुधन योजनेचा उद्देश, रोजगार निर्मिती व उद्योजकता विकास याबाबत मार्गदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम

Wed Sep 25 , 2024
यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने न्याय सेवा सदन येथे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते. कार्यक्रमाला जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव के. ए. नहार तर प्रमुख वक्ते जी. आर. कोलते व प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश शेख मो. जुनेद मो जलाल तसेच वकील मंडळी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पीएलव्ही उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com