पदवीधर, शिक्षक निवडणूकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

नवीमुंबई :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकी संदर्भात माहिती व सूचना देण्याकरिता विविध पक्षाच्या प्रतिनिधींची उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी बैठक घेतली.

या बैठकीस उपआयुक्त (करमणूक) संजीव पालांडे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, तसेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, बहुजन समाजवादी पार्टी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा विविध पक्षाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी बुधवार, दि.26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा दिनांक निहाय कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व सूचना देण्याकरिता पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना निवडणूक कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. तसेच अनामत रक्कमे संबधित माहिती, नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाची कागदपत्रे , शपथ पत्रातील सूचना, आदर्श आचारसंहितेसंबधी माहिती, मतदान केंद्रांची माहिती, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती या बाबत तपशीलवार माहिती दिली.

यावेळी निवडणूकी संदर्भात पक्षाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी सोप्या शब्दात निरसन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोंकण भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

Wed May 29 , 2024
नवीमुंबई :- स्वातंत्र्यवीर समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.”सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते”, “तानाजीचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com