शेतकऱ्यांना न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प, जलयुक्त शिवार अभियान-2 साठी ६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

यवतमाळ :- राज्याच्या विकासाच्या दृष्टीने शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, महिला सक्षमीकरण, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. जलयुक्त शिवार अभियान-2.0 साठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पाचा महाराष्ट्रातील जनतेला लाभ होणार आहे, असे सांगत मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून नेतृत्व करत असताना जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण झाली असून या आर्थिक वर्षासाठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 338 जलाशयातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. लोकसहभागातून आतापर्यंत 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला असल्याचेही अर्थसंकल्पात सादर करण्यात आले.

मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्वारे महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णयांचा अर्थसंकल्पात समावेश असल्याचे ना. संजय राठोड म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी आमदार देवेंद्र भुयार यांची यशस्वी लढाई !

Sat Jun 29 , 2024
– अजित पवार यांनी केली रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ! – आमदार देवेंद्र भुयार यांनी मानले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार ! मोर्शी :- महाराष्ट्र राज्यातील बारी समाजाच्या विवीध समस्या सोडविण्यासाठी त्यांना न्याय मिळून देण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी १३ आक्टोंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन महाराष्ट्र बारी समज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com