– २१ ऑगस्टच्या भारत बंदला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जाहिर समर्थन
नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून सात दशकांहून अधिक काळ राबवल्या गेलेल्या आरक्षणाच्या धोरणाचा फायदा प्रत्येक वर्गाला मिळाला आहे. भारताच्या अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी)चे आरक्षण धोरण हे आर्थिक विकासाचे धोरण नसून सामाजिक न्यायाचे हत्यार आहे. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या एससी-एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरण व क्रिमी लेअरबाबत 1 ऑगस्ट रोजी दिलेला निर्णय हा समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारा आहे. राज्यांवर थोपविण्यात आला हा आदेश एससी-एसटी मधील जाती जातीत संघर्ष पेरणारा आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली. उपरोक्त निर्णय संसदेने तात्काळ रद्द करून घटना दुरुस्ती करावी यासाठी देशातील सामाजिक, कामगार, कर्मचारी, राजकीय संघटनानी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पीपल्स रिपब्लिकन पार्टी जाहिर समर्थन असून आपण आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही जयदीप कवाडे यांनी सागितले.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे जयदीप कवाडे यांनी सांगितले की, अश्या निर्णयाने मागासवर्गीयांचे आरक्षणाला समाप्त कण्याची वाटचाल ठरणारा आदेशाला केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावे. तसेच एसएसी-एसटीचे आरक्षण कायदेशीर करण्यासाठी घटनेच्या शेड्युल 9 मध्ये अंतर्भाव करण्यासाठी संसदेने कायदा तयार करावा. बाबासाहेबांनी घटनेत प्रत्येक घटकातील सर्व प्रर्वगाचा विचार करून समान न्याय देण्याचे काम केले आहे. देशात एकसंघता राहण्यासाठी तयार केलेल्या तरतुदींना आता उपवर्गीय करण्याचा घाट करण्याचे काम आज होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी एससी-एसटी घटक हा प्रशासनाचा भाग नव्हता म्हणून त्यांच्यासाठी तयार केलेले न्यायिक धोरण हे अन्याय दूर करण्यासाठी होते. परंतु, घटकाला श्रेणी वर्गीकृत केले तर समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन होणार. एससी-एसटी आरक्षणास ‘क्रीमी लेयर’ आर्थिक निकष लावण्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा तीव्र विरोध आहे. 21 ऑगस्टच्या बंद आंदोलनात पीरिपा राज्यात सहभागी होणार असल्याचेही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी सांगितले.