बांधकाम साहित्य उघड्यावर टाकल्याने ७००० दंड वसुल.

चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रस्त्यावर बांधकाम साहीत्य ठेवणाऱ्या नागरिकांकडुन ७००० रुपयांचा दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे.

यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येते. मात्र या घटनांची पुनरावृत्ती बघता स्वच्छतेप्रती आपली मानसिकता बदलण्याची गरज निश्चितच वाटते. स्वच्छता ही स्वच्छता कर्मचाऱ्यांइतकीच आपलीही जबाबदारी आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहेत. दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे हा यामागचा हेतू आहे.

स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे हे प्रकार केले जातात. स्वच्छतेची सवय लावुन महानगरपालिकेच्या प्रयत्नांना योग्य तो सहयोग करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

मनपाने घेतलेल्या शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली. अनेक चौकांची स्वच्छताच झाली नाही तर त्या जागा नियमित स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही त्या सहभागी संघांनी घेतली. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या स्वच्छता मोहीमेस केवळ काही नागरिकांच्या दुर्लक्षितेमुळे गालबोट लागु नये याची दक्षता घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

तसेच मनपा पथकांमार्फत नायलॉन मांजाला हद्दपार करण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून प्रत्येक दुकाने आस्थापनांची मनपाने गठीत केलेल्या पथकांमार्फत कसुन तपासणी करण्यात येत आहे. नायलॉन मांजाची विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे यापुर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थी नागरिकांना ५ लक्ष रुपयांचा मोफत आरोग्य विमा!

Sat Dec 24 , 2022
महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे. या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या सहाय्याने एकूण १२०९ उपचार व शस्त्रक्रियांवर रुग्णास मोफत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com