संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांना नगर परिषद हद्दीतील लाभार्थ्यांना दोन लक्ष 50 हजार रुपये तर ग्रामीण भागात एक लक्ष 40 हजार रुपये अनुदान दिले जाते .नागरी हद्दीतील तुलनेत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान अतिशय तुटपुंजे असून वाढत्या महागाईत घर बांधणीचे साहित्य महागल्यामुळे या किमतीत घर उभारू शकत नसल्याने ग्रामिन भागातील नागरिकात नाराजगीचा सूर वाहत असून त्यांना घरकुल पूर्णत्वासाठी अतिरिक्त कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करावे लागत आहे त्यातच कित्येक लाभार्थ्यांचे घरकुल अर्धवट स्थितीत आहे तेव्हा ‘हो जी या तुटपुंज्या अनुदानात घरकुल पूर्ण कसे करणार जी’अशी व्यथा बोलून दाखवत आहेत.
ग्रामीण भागामध्ये सिमेंट, लोखंड,रेती ,विटा आदी बांधकाम साहित्य बहुधा शहरातून वाहतूक करून आणावे लागते त्यामुळे वाहतूक खर्च अतिरिक्त लागत असतो तर ग्रामीण भागात खर्च जास्त आणि शहरी भागात हा खर्च कमी लागतो तरीही शासनाकडून शहरी भागासाठी जास्त अनुदान आणि ग्रामीण भागासाठी कमी अनुदान दिले जाते .सध्या महागाई गगनाला भिडली आहे.सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत त्यामुळे ग्रामीन भागातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारे पंतप्रधान आवास योजनेचे 1 लक्ष 40 हजार रुपये अनुदान हे तोकडे पडत आहेत.उलट घरातून पैसे घालावे लागतात त्यासाठी अतिरिक्त कर्ज उचलावे लागते .मिळत असलेल्या अनुदानात घर पूर्णत्वास आणणे शक्य नाही .आधीच कमी असलेले अनुदान हे वेळेवर मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्याची वेळ लाभार्थ्यावर येत आहे.पैसे संपल्याने उसनवार करून घराचे स्वप्न पूर्ण करावे लागते त्यामुळे शासनाने वाढत्या महागाईचा विचार करून शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुदधा अडीच लक्ष रुपये अनुदान शासनाने द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी रेटून धरली आहे.
@ फाईल फोटो