कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची ‘महायुती’चा स्टार प्रचारक म्हणून निवड

– ‘पीरिपा‘च्या केंद्रीय उच्चधिकार समितीचा निर्णय

मुंबई/नागपुर :-पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 400 हून अधिक जागा जिंकणार आहे. देशात सर्वाधिक जागा असलेले दुसरे राज्य महाराष्ट्र असून येथील 48 जागां हे महायुती सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. राज्यात 45 जागा मिळविण्याचे लक्ष्य महायुतीचे आहे. राज्यात शिवसेना प्रमुख तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात घटक पक्ष असलेला पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा सुद्धा आहे. मुंबई आज झालेल्या ‘पीरिपा’च्या केंद्रिय उच्चसमितच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची महायुतीच्या प्रचार मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘पीरिपा’चे महाराष्ट्र उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

राज्यातील महायुतीचा मित्र पक्षातील एक भाग म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी आहे. आगामी निवडणूकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मोठा संख्येने मतदार आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे हे स्टार प्रचारक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार. देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या लोकशाही टिकविण्याचे काम आज पंतप्रधान मोदी करीत आहे. मोदी परिवराच्या सदस्य बनूनच आज त्यांच्या सोबत देशातील विविध राज्यातील घटकपक्ष काम करीत आहे. तसेच या घटक पक्षाच्या मदतीनेच मोदीजींचे स्वप्न 400 पार करण्यास सज्ज झाले आहे. मोदींच्या या 400 लोकसभेच्या जागा मिळवून देण्यासाठी हातभार लावण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पूर्ण ताकदीने उभी आहे, असेही मृणाल गोस्वामी यांनी सांगितले.

‘पीरिपा’ पूर्ण ताकदीने प्रचार करणार

राज्यात एकीकडे जातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडून होत आहे. अश्या पद्धतीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर महायुती सरकार व पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्यामुळेच आज राज्यात जातीय तेढ निर्माण होत नाही आहे. महाराष्ट्रात महापुरुष व संताच्या भूमिला बदनाम करणाऱ्यांना त्यांची जागा मतदार हा विरोधात उभा असलेल्या महाविकास आघाडीला दाखविणाराच. राज्यात बहुजन व वंचितांच्या प्रामाणिक मतदारांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी वर विश्वास आहे. गेल्या अनेक निवडणूकांमध्ये या मतदाराने पीरिपा वेळोवेळी विश्वास ठेवला आहे. त्यांच्या सन्मानार्थ मुंबईत आज बुधवारी 3 एप्रिल रोजी झालेल्या ‘पीरिपा’च्या केंद्रिय उच्चसमितच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची महायुतीच्या प्रचार मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून महायुतीचा महाविजय खेचून आणता येईल हा सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे, असल्याचेही मृणाल गोस्वामी यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी - संजय शिंत्रे

Thu Apr 4 , 2024
– ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लोकसभा निवडणूक – २०२४ निमित्त विशेष मुलाखत मुंबई :- सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com